“दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.”
“खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.”
“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”
“खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.”
“संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.”
“निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.”
“शहाण्याला शब्दांचा मार.”
“तोंड बंद ठेवलं तर, तर मासाही अडचणीत येत नाही.”
“करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.”
“रिकामे डोके शैतानाचे घर असते.”
“संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”
“ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.”
“मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.”
“चकाकते ते सर्व सोन नसते.”
“कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.”
“जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.”
“खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.”
“संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”
“कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.”
“वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.”
“लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.”
“बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.”
“सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.”
“विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.”
“जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”
“अंधश्रद्धे पेक्षा मौन कधीही चांगले.”
“एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”
“चरित्र हाच खरा इतिहास असतो.”
“नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो.”
“दिलेले दान केव्हाच निरर्थक ठरत नाही.”
“विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही.”
“आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही.”
“श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते.”
“मैत्री म्हणजे समानता.”
“मैत्री जत्रेत विकत घेता येत नाही.”
“परमेश्वर एकच आहे, पण रूप अनेक आहेत.”
“भाग्य नेहमी धैर्यवानालाच अनुकूल असते.”
“सर्वांचे ऐकून घ्या, पण फार थोड्यांजवळ स्वतः चे मन मोकळे करा.”
“कीर्ती ही सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर जात असते.”
“थोर कार्य ही थोर मनाची प्रतीके असतात.”
“मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात.”
“मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते.”
“सर्व साधारण व्यक्ती सुप्त मेंदूचा केवळ 10 टक्केच वापर करतो.”
“जो नेहमी हसतो तो नेहमी विजय होतो.”
“जो परोपकारी स्वभावाचा तो खरोखर थोर होय.”
“स्वतः वर नियंत्रण ठेवणारा चांगले राज्य करू शकतो.”
“आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.”
“इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.”
“इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो.”
“जो वेळ काढतो त्याला सर्व काही मिळते.”
“स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे.”
“जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.”
“वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात.”
“कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात.”
“सर्व गोष्टींच्या बाबतीत नेहमीच निराशेपेक्षा आशा बाळगणे चांगलेच असते.”
“वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.”
“पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.”
“द्वेष करणे सोपे असते,पण प्रेम करणे आरोग्यदायक असते.”
“माणसाला शत्रू नसणे ही अशक्यप्रायः गोष्ट आहे.”
“मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते.”
“ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरी ने पुढे जाते.”
“ज्ञान दुसऱ्याला देता येते, पण शहाणपण देता येत नाही.”
“श्रम हेच जीवन.”
“संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टीचे मूळ आहे.”
“जीवन हे फुल आहे आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे.”
“जीवन म्हणजे पराकोटी चा आनंद होय.”
“सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.”
“माणूस परिस्थितीचा गुलाम असतो.”
“सहनुभूती ही जीवनातील सुंदर गोष्ट आहे.”
“इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते.”
“फसविण्यात अत्यंत सोपी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः च होय.”
“या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.”
“श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते.”
“वर्तमानकाळ हा भविष्यकाळ विकत घेत असतो.”
“माणूस जितका मूर्ख, तितका तो खोटा बोलणारा असतो.”
“सत्याचा खरा मित्र म्हणजे काळ.”
“अशक्य गोष्ट ती कि जिच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात.”
“उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.”
“जो निष्पाप असतो, त्याला सुखाची झोप लागते.”
“दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच.”
“तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.”
“श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते.थोड्या आनंदात गोडी असते.”
“द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते.”
“दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.”
“आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.”
“साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”
“उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.”
“चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.”
“सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.”
“श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.”
“माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.”
“घाबरटाला सारेच अशक्य असते.”
“सत्य हे अमर आहे, तर चूक ही मर्त्य आहे.”
“एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.”
No comments:
Post a Comment